घरातून पळून आलेल्या प्रेमी जोडप्यांना 'या' गावात मिळतो आश्रय; मोफत राहण्याची, जेवणाची सोय

जोडप्यांची संख्या काही कमी नाही

प्रेमासाठी घर सोडून पळून जाणाऱ्या जोडप्यांची संख्या काही कमी नाही. चित्रपटांमध्ये तर अशी जोडपी अनेकदा दिसतात. भारतातील अनेक जोडपी पळून कुठे जातात माहितीये का?

देशभरातून पळून आलेली जोडपी इथे येतात

मात्र आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत जिथे देशभरातून पळून आलेली जोडपी आवर्जून येतात.

प्रेमी जोडप्यांना आश्रय का देतात?

यामागील कारण म्हणजे या गावातील गावकरी प्रेमी जोडप्यांना आश्रय देतात. यामागील रंजक गोष्ट आपण जाणून घेऊयात...

कुठे आहे हे मंदिर?

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यामध्ये शंगचुल महादेव मंदिर आहे.

प्रेमी जोडपी इथे आश्रय घेतात

देशभरातून पळून आलेली प्रेमी जोडपी इथे आश्रय घेण्यासाठी येतात. इथे त्यांची मोफत राहण्याची आणि खाण्याची सोय केली जाते.

त्रास देत नाही किंवा जबाब विचारत नाही

या मंदिरामध्ये प्रेमी जोडप्यांना कोणीही कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही किंवा जबाब विचारत नाही.

सर्वात सुरक्षित जागा

याच कारणामुळे या मंदिराला पळून आलेल्या जोडप्यांसाठी सर्वात सुरक्षित जागा मानली जाते.

...म्हणून दिला जातो आश्रय

आपण प्रेमी जोडप्यांना आश्रय दिला नाही तर देव आपल्यावर नाराज होईल अशी येथील गावकऱ्यांची मान्यता आहे.

पांडव या गावात आले होते

धार्मिक मान्यतांनुसार पांडव या गावामध्ये आश्रयासाठी आले होते तेव्हा गावकऱ्यांनी पांडवांना या मंदिरात आश्रय दिलेला.

स्वत: देवाने कौरवांना रोखलं

त्यावेळेस कौरव या गावात आले होते तेव्हा स्वत: शंगचुला महादेवाने या त्यांना या गावात प्रेवश घेण्यापासून रोखलं होतं.

पोलिसांनाही एन्ट्री नाही

या गावामध्ये पोलिसांनाही प्रवेशबंदी आहे. तसेच गावामध्ये कोणत्याही पद्धतीचं शस्र घेऊन या गावात जाण्यासाठी परवानगी नाही.

VIEW ALL

Read Next Story