मस्करीतही नवऱ्याला 'या' गोष्टी बोलू नका

हे ऐकून घ्या

कोणतंच नतं परफेक्ट नसतं. नवरा-बायकोचं नातं तर तिखट-गोड असतं. कधी प्रेम तर कधी वाद. पण या नात्यात असताना नवऱ्याला काही गोष्टी चुकूनही बोलू नका.

सोपं नाही हे नातं

लग्न टिकवणे हे अतिशय कठीण होत चाललेली गोष्ट आहे. मग ते लग्न अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज ते टिकवणे गरजेचे असते. यासाठी खूप मेहनत करावी लागते.

मस्करीतही नका करू

अनेकदा बायको नवऱ्याची मस्करी करतो. पण तुम्हाला माहित आहे का? की, यामुळे तुमच्या पतीचं मन दुखावलं जाऊ शकतं. हे तुमच्या वादाचं एक कारण असू शकतं.

महागडी भेट वस्तू दिली नाही

प्रत्येक नवऱ्याला वाटतं की, आपण पत्नीला खूप आनंद द्यावा. पण पत्नी जर मस्करीत म्हणाली की, तू मला काही महागडी भेटवस्तू दिली नाही तर हा वाद चिघळू शकतो.

राणी बनून राहिले असते

अनेकदा बायका नवऱ्याला ऐकवण्यासाठी म्हणतात की, दुसऱ्याशी लग्न केलं असतं तर राणी बनून राहिले असते. हे वाक्य पुन्हा कधीच बोलू नका.

माहेरचे कौतुक

बायकोने कधीच नवऱ्यासमोर माहेरचं जास्त कौतुक करू नये. कारण शेवटी हे तुमचंच घर आहे. अशावेळी वाद होऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story