महाराष्ट्रातील 'कैलास'; एका भेटीत भारावून जाल...

मंदिरं

भारतात अशी अनेक मंदिरं आहेत, ज्या प्रत्येकाच्या निर्मितीमागे कैक रहस्य आणि उत्तम स्थापत्यशास्त्राची रहस्य दडली आहेत.

मंदिर निर्मिती

असंच एक मंदिर कमाल कलाकृतीचं उदाहरण असून, त्याच्या निर्मितीसाठी 100 हून अधिक वर्षांचा कालावधी अर्थात एका शतकाचा कालावधी गेला होता.

कैलास

जवळपास 7000 मजुरांनी या मंदिराची निर्मिती केली असून, या मंदिराला कैलास मंदिर म्हणून संबोधतात.

खडक

महाराष्ट्रातील औरंगाबाद इथं असणाऱ्या एल्लोरा इथं हे मंदिर आजही दिमाखात उभं आहे, ज्याची निर्मिती संपूर्ण खडक कापून करण्यात आली आहे.

टन

शंकराला समर्पित या मंदिरामध्ये जवळपास 40 हजार टन खडक तासून त्यापासून ही वास्तू तयार करण्यात आली आहे.

हिमालयाची प्रतीकृती

हिमालयातील कैलासाप्रमाणं या मंदिराचं रुप असून, इथं पूजा झाल्याचे कोणतेही पुरावे आजवर मिळाले नाहीत.

VIEW ALL

Read Next Story