पैसा आणि प्रगतीला वाईट नजरेपासून रोखतात 'या' 3 गोष्टी; क्षणात दूर होईल दोष

एखाद्याची आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती खराब होण्यामागे वाणी दोष कारणीभूत असतो. वाणी दोषामुळेच उत्पन्न, सुख आणि प्रगती यांच्यावर प्रभाव पडतो.

आपल्या पत्रिकेत वाणी दोष निर्माण होण्याची कारणं आणि उपाय समजून घ्या.

वाणी दोष कसा होतो?

पाप ग्रहांना वाणी दोषासाठी जबाबदार मानलं जातं. बुध किंवा देवगुरु बृहस्पतीमधील गडबडही वाणी दोष निर्माण करु शकतात.

शनी आणि राहू वाणीला सर्वात जास्त खराब करतात. बुध, बृहस्पती किंवा शुक्र ग्रह व्यक्तीच्या वाणीत गोडवा भरण्याचं काम करतात.

वाणी गोड कशी होईल?

जर वाणी दोषामुळे तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होत असतील, प्रगती खुंटली असेल तर काही विशेष गोष्टींमुळे लाभ होतो.

रोज सकाळी आणि संध्याकाळी गायत्री मंत्राचा जप करा. खाणं, पिणं शुद्ध ठेवा. मांस, मद्य आणि शक्य असल्यास लसूण, कांदा टाळा.

दर महिन्यात पोर्णिमाचा उपवास ठेवा.

एकादशी किंवा पोर्णिमासारख्या शुभ मुहूर्तांवर सर्व देवी-देवतांचा गंगाजलाने अभिषेक करा. चुकीच्या वाणीचा उपयोग केल्यास कृष्ण-कृष्ण, राधे-राधे म्हणा.

VIEW ALL

Read Next Story