मिरचीचं रोप घरी का लावू नये? जाणून घ्या काय सांगतात वास्तूविशारद

आपण अनेकदा ऐकत असतो की घरात मिरचीचे रोप लावू नये पण यामागील कारणं आपल्याला माहित नसतात. जाणून घेऊयात का घरात मिरचीचे रोप लावू नये.

मान्यतेनुसार, घरात मिरचीचं रोप लावणं भांडणाचं कारण बनू शकतं.

मिरची ही वनस्पती नेहमीच तीक्ष्ण, ज्वलंत स्वभावासाठी ओळखली जाते.

एवढूशी दिसणारी मिरची ही केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर चटपटीतपणा देखील वाढवते.

वास्तूशास्त्रानुसार, तीक्ष्ण, काटेरी किंवा मसालेदार झाडं घरासाठी आक्रमक ऊर्जा ऊत्सर्जित करते.

यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते आणि घरामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

घरामध्ये मिरचीचे रोप लावल्याने कुटुंबातील सदस्यामध्ये गैरसमज वाढू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, याचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो.

असं म्हटसं जातं की घरातील वनस्पती त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या कल्याणावर परिणाम करतात.

त्याचबरोबर घरात मिरचीचं रोप लावणं आर्थिक समस्यांचं कारणदेखील बनू शकतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story