भक्त म्हणतात, 'ही कोर्ट केसमधून वाचवणारी देवी...'; 'या' मंदिरात दर्शन घेणं म्हणजे सुटकेचा निश्वास

भक्तांची कायम गर्दी

धार्मिक मान्यतांनुसार पांडवांनी हिमाचल प्रदेशमधील बगलामुखी मंदिराची स्थापना केली आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक येतात.

एका रात्रीत उभारलं मंदिर

असं म्हटलं जातं की, द्वापार युगामध्ये पांडवानी अज्ञातवासात असताना एका रात्रीत हे मंदिर निर्माण केलं होतं.

पांडवांनी केलेली विशेष पुजा

पांडवांपैकी अर्जुन आणि भीमाने युद्धादरम्यान विशेष शक्ती मिळवण्यासाठी या मंदिरामध्ये बगलामुखी मातेची विशेष पुजा केल्याचंही सांगितलं जातं.

लाल मिर्चीची आहुती दिली जाणारं यज्ञ

हे मंदिर भाविकांमध्ये शत्रुनाशिनी आणि वाकसिद्धी सारख्या यज्ञांसाठी प्रसिद्ध आहे. येथे होणाऱ्या शत्रुनाशिनी यज्ञामध्ये लाल मिर्चीची आहुती दिली जाते.

पितांबरी देवीही म्हणतात

असं म्हणतात की बगलामुखी देवी पिवळ्या रंगाच्या पाण्यातून प्रकट झाली होती. त्यामुळेच या देवीला पितांबरी देवीही म्हणतात.

देवीचं दर्शन घेतलं तर...

भक्तांची अशी मान्यता आहे की या मंदिरातील बगलामुखी देवीचं दर्शन घेतल्याने कोर्टासंदर्भातील प्रकरणांमधून लवकर सुटका होते किंवा ती प्रकरणं निकाली लागतात.

कोर्टाच्या फेऱ्या मारत असलेल्याने...

दिर्घकाळ एखादी व्यक्ती एखाद्या प्रकरणामध्ये कोर्टाच्या फेऱ्या मारत असेल तर तिने बगलामुखीचं दर्शन घ्यावं असं सुचवलं जातं.

दर्शन घेतलं तर...

कोर्ट केस सुरु असलेल्याने या देवीचं दर्शन घेतलं तर निकाल त्याच्या बाजूने लागतो अशी भक्तांची मान्यता आहे.

सेलिब्रिटी भक्त

केवळ सामान्य भक्तच नाही तर बगलामुखी देवीच्या भक्तांमध्ये अनेक नेते आणि कलाकारांचाही समावेश आहे.

रावणानेही केलेली पुजा

मान्यतेनुसार, रावणानेही बगलामुखी देवीची पुजा केली होती.

सामान्य माहितीवर आधारित

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या दावा केला गेलेला नाही.)

VIEW ALL

Read Next Story