राखी, द्रौपदी, श्रीकृष्ण...महाभारतातून सुरु झाला राखीपौर्णिमेचा सण?

Published by: Zee Team | Aug 10, 2024

रक्षाबंधन हा सण फार प्राचीन काळपासून साजरा केला जात आहे. यामागे अनेक कथा सागिंतल्या जातात पण सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी.

Published by: Zee Team | Aug 10, 2024

भगवान श्रीकृष्ण द्रौपदीचा भाऊ कसा झाला , त्यांनी द्रौपदीला कोणते वचन दिले आणि बहिण भावाच्या मनगटावरच राखी का बांधते हे जाणून घेऊया.

Published by: Zee Team | Aug 10, 2024

महाभारतानुसार, ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी शिशुपालला सुदर्शन चक्राने मारले तेव्हा सुदर्शन चक्र बोटावर बसण्याआधीच श्रीकृष्णांचे मनगट कापले.

Published by: Zee Team | Aug 10, 2024

तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा काट फाडून भगवान श्रीकृष्णाच्या मनगटावर बांधले. तेव्हा श्रीकृष्णांने द्रौपदीला तिचे नेहमी रक्षण करेल असे वचन दिले.

Published by: Zee Team | Aug 10, 2024

भगवान श्रीकृष्णांनी देखील दिलेले वचन पाळले. जेव्हा पांडवांनी द्रौपदीला कौरवांकडून जुगारात हरवलं त्यावेळी त्यांनी सगळ्यांसमोर तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला.

Published by: Zee Team | Aug 10, 2024

तेव्हा द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाचे स्मरण केले.कृष्ण आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी प्रकट झाले आणि आपले वचन पाळले.

Published by: Zee Team | Aug 10, 2024

कौरव द्रौपदीची साडी जसजसे ओढत होते तसतसे तिचे शरीर झाकले जात होते.

Published by: Zee Team | Aug 10, 2024

VIEW ALL

Read Next Story