मुंबईचा कर्णधार पुन्हा बदलला


बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट सामन्यातून वगळलेला मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेकडे नुकतंच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.


रणजी ट्रॉफी 2024 चा सिझन सुरु झाला असून मुंबईच्या टीमची धुरा अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे.


टीम इंडियातून डच्चू मिळाल्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणे कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र त्यांचा हिरमोड झाला.


रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच बिहारविरूद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेला वगळण्यात आलं.


रहाणेच्या जागी शम्स मुलानीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अचानक उद्भवलेल्या मानेच्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे या सामन्यातून बाहेर गेलाय.


अजिंक्य रहाणे आगामी रणजी ट्रॉफींच्या सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story