सीरिजदरम्यान संपूर्ण इंग्लंड संघाने भारत सोडला? नेमकं काय झालं.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने इंग्ंडवर 106 धावांनी विजय मिळवला. 9 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला

Published by: Zee Team | Feb 05, 2024

आता भारत आणि इंग्लंडदरम्यानचा तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. हा सामना राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

पण या सामन्याच्याआधीच इंग्लंडने भारत देश सोडला आहे. संपूर्ण इंग्लंड संघ युएईसाठी रवाना झाला.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने याची माहिती दिली आहे. इंग्लंड संघ सराव शिबिरासाठी युएईला रवाना झालाय.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्याआधी म्हणजे 13 फेब्रुवारीपर्यंत इंग्लंड संघ राजकोटला पोहोचेल, असं बेन स्टोक्सने सांगितलं.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

वास्तविक इंग्लंडसाठी युएईमध्ये सराव शिबिर ठेवण्यात आलं आहे. मालिकेआधीदेखील इंग्लंडचा संघ युएईत सराव करत होता. आता तिसऱ्या सामन्याआधी पुन्हा युएईमध्ये सराव होईल.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

VIEW ALL

Read Next Story