भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

आता या मालिकेतला तिसरा टी20 सामना मंगळवारी गुवाहाटीत खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय.

टीम इंडियाने तिसरा टी20 सामना जिंकल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध डबल हॅटट्रीक करण्याचा विक्रम होणार आहे.

तिसरा सामना जिंकत टीम इंडिया विजयाची हॅटट्रीक करेल. तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन टी20 मालिका जिंकण्याचा विक्रमही करेल

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 2020 ते 2022 दरम्यान दोन टी20 मालिका खेळवल्या गेल्या. या दोन्ही मालिका भारताने 2-1 अशा जिंकल्या होत्या.

2020 साली झालेल्या पहिल्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहेत. यशस्वी जयस्वाल, ईशान किशन, सूर्या, ऋतुराज गायकवाड ही टॉप ऑर्डर खोऱ्याने धााव करतेय.

VIEW ALL

Read Next Story