या विजयाबरोबरोट टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ समाप्त झाला. रोहित, विराट आणि जडेजानेही टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली.
या ऐतिहासिक विजयानंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी राहुल द्रविडचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. द्रविडला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी त्यांनी केलीय.
या वर्षीच्या सुरुवातीला काही नेत्यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सर्वांचं देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान होतं. त्यांचं योगदान हे त्यांच्या भागापूरतं मर्यादित होतं.
पण राहुल द्रविडच्या योगदानाने देशाच्या सर्व समुदायातील लोकांना आनंदाचे क्षण दिले आहेत. देशाती जनतेने सरकारकडे मागणी करावी असंही गावसकर यांनी म्हटलं आहे.