World Cup मधील धोनीच्या 'त्या' षटकारावर गंभीरचं मोठं विधान; व्यक्त केला सगळा राग

Published by: Zee Team | Aug 24, 2023

भारताने दोन वेळा जिंकला आहे World Cup

याआधी भारतीय संघाने 1983 मध्ये कपिल देव आणि 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2023

धोनीने लगावला होता विजयी षटकार

2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धोनीने विजयी षटकार लगावला होता. धोनी प्लेअर ऑफ द मॅचही राहिला होता.

Published by: Zee Team | Aug 24, 2023

गंभीरने केल्या होत्या 97 धावा

अंतिम सामन्यात गौतम गंभीरने 97 धावा केल्या होत्या. तर युवराज सिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता.

Published by: Zee Team | Aug 24, 2023

पण चर्चा फक्त धोनीच्या षटकाराची

पण चाहते आजही धोनीच्या षटकाराबद्दलच चर्चा करताना दिसतात. यामुळे नाराज झालेल्या गौतम गंभीरने एका मुलाखतीत संताप व्यक्त केला आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2023

"एकटा खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत"

फक्त एक खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत नाही. असं असतं तर भारताने आतापर्यंतचे सगळे वर्ल्डकप जिंकले असते असं गंभीरने म्हटलं आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2023

गंभीरचा संताप

"मी 97 धावा केल्या त्याबद्दल बोलू नका. पण युवराज सिंग, झहीर खान, मुनाफ पटेल यांनी चांगली कामगिरी केली होती," असं गंभीरने सांगितलं आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2023

"सचिन तेंडुलकरनेही शतकं ठोकली होती"

"सचिन तेंडुलकरनेही त्या वर्ल्डकपमध्ये 3-4 शतकं ठोकली होती. किती लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलतात".

Published by: Zee Team | Aug 24, 2023

"सोशल मीडियामुळे फक्त षटकाराची चर्चा"

"पण लोक आजही फक्त त्या षटकाराबद्दल बोलतात. हे सर्व मीडिया आणि सोशल मीडियामुळे आहे," असा संताप गंभीरने व्यक्त केला आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2023

VIEW ALL

Read Next Story