विराटचे अनुष्कासोबत रोमॅंटिक सेलिब्रेशन, 'हा विजय तुझ्याशिवाय...'

virat Anushka Celebration: टीम इंडियाने T20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकून गेल्या 17 वर्षांचा दुष्काळ संपवला.

अंतिम सामना जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

आता विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये कोहलीने विश्वचषक जिंकण्याचे श्रेय अनुष्का शर्माला दिले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये विराटच्या बॅटमधून 76 धावांची उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली.

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्रामवर अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यात रोमॅटींक मेसेजही लिहिला.

'माझ्या प्रिये, तुझ्याशिवाय हे सर्व शक्य झाले नसते. तू मला नम्र, मूळांशी जोडलेला ठेवतेस आणि जे असेल ते पूर्ण प्रामाणिकपणे सांगतेस.

मी तुझे पुरेसे आभार मानू शकत नाही. हा विजय जितका माझा आहे तितकाच तुझा आहे. आभारी आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू तुझ्यासारखीच आहेस.'

संपूर्ण टी-२० विश्वचषकात फॉर्ममध्ये नसलेल्या विराट कोहलीने अंतिम सामन्यात आपल्या बॅटने जबरदस्त कामगिरी केली.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने लवकरच तीन विकेट गमावल्या पण एकीकडे विराट कोहलीने बाजू लावून धरत होता.

विराट कोहलीने अक्षर पटेलसह भारताच्या डावाची धुरा सांभाळली आणि टीमला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला.

या सामन्यात कोहलीने 59 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 76 धावा केल्या. या खेळीसाठी तो सामनावीर म्हणूनही निवडला गेला.

VIEW ALL

Read Next Story