फोनची बॅटरी टिकवून ठेवायची आहे? तर 80:20 नियम करा फॉलो

Published by: Zee Team | Jul 05, 2024

प्रत्येकालाच फोन चार्ज करण्याच्या वेगवेगळ्या टीप्स माहित असतात.काही लोकांच असं म्हणणं असतं की, फोनची बॅटरी पूर्णपणे संपवून फोन चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य चांगले राहते. पण असे काही नसते.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

जर तुम्हाला बॅटरी नेहमी चांगल्या स्थितीत ठेवायची असेल तर तुम्ही हे 80:20 नियम पाळले पाहिजेत.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

स्मार्टफोनच्या या जगात आपले आयुष्यादेखील स्मार्ट होत आहे. प्रत्येक कामासाठी फोनची गरज भासत असल्यांने त्याची बॅटरी टीकवून ठेवणे महत्त्वाचे झाले आहे.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

जर बॅटरी स्वत:च खराब होऊ लागल्याने फोन देखील खराब होतो. त्यामुळे फोनची बॅटरी योग्यप्रकारे चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य वाढते.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

काही लोकांचा या गोष्टीवर विश्वास आहे की, फोनची बॅटरी 0% झाल्यावरच फोन 100% चार्ज करायला हवा. तुम्ही देखील असं करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

अशावेळी सर्वोत्तम नियम 20-80 म्हणजेच ज्यावेळी बॅटरी 20 टक्के शिल्लक असेल त्यावेळी ती चार्ज करावी. आणि जेव्हा ती 80 टक्क्यांपर्यंत पोहचेल तेव्हा चार्जिंग बंद करावा.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

काही तज्ज्ञांच्या मते बॅटरी 90 टक्क्यांपर्यंत देखील चार्ज केली जाऊ शकते.तुम्ही हा नियम पाळल्यास तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढेल.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

जर तुम्ही फोन चार्जिंगला ठेवून वापर करत असाल तर असं करणं टाळा. यामुळे फोनच्या प्रोसेसरवर ताण येतो.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

फोन चार्ज करताना कंपनीकडून मिळालेलाच चार्जरच वापरा.

Published by: Zee Team | Jul 05, 2024

VIEW ALL

Read Next Story