विवेक अग्निहोत्री यांची चर्चा

सध्या चर्चा आहे ती म्हणजे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची. सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.

सोशल मीडियावर व्हायरल

यावेळी त्यांची एक मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे.

महाभारतावर एक प्रश्न

यावेळी त्यांना महाभारतावर एक प्रश्न विचारण्यात आला होता.

पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला

विवेक अग्निहोत्री यांचा The Kashmir Files प्रचंड गाजला. आता या चित्रपटाचा पुढचा भाग येतो आहे.

मुलाखत व्हायरल

त्यामुळे त्यांची चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी 'टाईम्स नाऊ'ला मुलाखत दिली होती.

महाभारतावर चित्रपट?

यावेळी तुम्ही महाभारतावर चित्रपट करणार का असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

संशोधनवृत्ती

यावेळी ते म्हणाले की, ''मी माझं संपूर्ण आयुष्य ही महाकाव्य वाचण्यात, संशोधन करण्यात आणि त्यावर भाषणं देण्यात घालवलं आहे, पण मी जर महाभारत बनवायचं ठरवलं तर मी ते इतिहासाच्या अनुषंगाने बनवेन.इतर लोक बॉक्स ऑफिससाठी कलाकृती करतात पण मी ती कलाकृती लोकांसाठी करू इच्छितो.''

धर्म विरुद्ध अधर्म

''बऱ्याच कलाकृतीमध्ये अर्जुन, कर्ण आणि भीम यांचं उदात्तीकरण केलेलं बघायला मिळतं, पण माझ्या डोळ्यासमोर महाभारत म्हणजे धर्म विरुद्ध अधर्म असंच उभं राहतं.'' असं ते म्हणाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story