स्थानिक संस्था ठेवतात नावं

ज्या भागामध्ये वादळ येणार आहे त्या भागांमधील स्थानिक संस्था या वादळांना नावं देऊ शकतात, असं या संस्थेचे नियम सांगतात. भारतीय उपखंडांमध्ये 8 देश मिळून नावं ठरवतात.

नियमांचं केलं जातं पालन

नावं आधी ठरली असतली तरी ही नावं जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत येणाऱ्या वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या नियमांनुसारच ठेवण्यात आली आहेत.

यादी तयार

या सर्व देशांनी एकत्रितपणे चक्रीवादळांची नावं निश्चित केली आहे. या चक्रीवादळांच्या नावांची एक यादीच या देशांनी तयार केली आहे. म्हणजेच वादळं येण्याआधीच त्यांची नावं ठरलेल्या क्रमाने दिली जातात.

या 8 देशांचा समावेश

या नवीन पद्धतीमध्ये प्रामुख्याने अरबी समुद्र, बंगलचा उपसागर आणि हिंदी महासागराशी संलग्न किनारपट्टी असलेले बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड या देशांचा समावेश आहे.

भारताचा पुढाकार

भारताच्या पुढाकारामुळे सन 2000 पासून सुरु झालेल्या भारतीय उपखंडाच्या परिसरात येणाऱ्या वादळांना नियोजनपूर्वक नावं देण्याची पद्धत 2014 पासून सुरु झाली.

अलटलांटिकमध्ये 1953 पासून देतात नावं

अलटलांटिक प्रांतामधील चक्रीवादळांना नावं देण्याची सुरुवात ही सन 1953 पासून झाली.

2000 पासून नामकरणाचा सुरुवात

भारत आणि त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये येणारी वादळं किंवा भारतीय उपखंड क्षेत्रातील समुद्रांमधील वादळांना नावं देण्याची पद्धत सन 2000 साली सुरु झाली.

नामकरण कसं केलं जातं

अनेकदा मोचा, गुलाब, निर्सग, जवाद, यास यासारख्या चक्रीवादळांची नावं वाचून नेमकं या वादळांचं नामकरण कसं केलं जातं असा प्रश्न पडतो.

मोचाचा धोका अन् अलर्ट

सध्या मोचा नावाचं चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा, पश्चिम बंगालसहीत आजूबाजूच्या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आळा आहे.

विचित्र नावं

जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये थैमान घालणाऱ्या चक्रीवादळांची नावं अनेकदा फार विचित्र वाटतात.

VIEW ALL

Read Next Story