चार पराभवांमुळे मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमधलं स्थान डळमळीत झालं आहे. पण अद्याप मुंबई स्पर्धेतून बाहेर पडलेली नाही.
मुंबई इंडियन्सला या हंगामात अद्याप सामने खेळायचे आहेत. प्ले ऑफ गाठण्यसाठी मुंबई इंडियन्सला सहा सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.
मुंबई इंडियन्सला लखनऊ आणि कोलकाताशी दोन सामने खेळायचे आहेत. तर पंजाब, राजस्थान, हैदराबाद आणि दिल्लीशी प्रत्येकी एक सामना खेळाचाय.
मुंबई इंडियन्सने 2014 मध्ये सुरुवातीचे पाच सामने गमावले होते. त्यानंतरही मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये जागा पटकावली होती.
आयपीएल 2015 मध्येही मुंबई इंडियन्सने चार सामने गमावले होते. यात हंगामात मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकापलं.
मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा, सूर्यकुमार, ईशान आणि बुमराह चांगल्या फॉर्मात आहेत. आणि सामन्याचा निकाल पलटवण्याची त्यांच्यात क्षमता आहे.