मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठवलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडं मुंबई विद्यापीठाचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आलाय. तर व्हीजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांची प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आलीय.


मुंबई परीक्षांचा निकाल वेळेवर न लागल्यानं कुलगुरू संजय देशमुख अडचणीत आले होते. निकाल लावण्यासाठी राज्यपालांनी देशमुखांना ३१ जुलैची मुदत दिली होती. मात्र, त्या मुदतीत सर्व परीक्षांचा निकाल जाहीर करणं मुंबई विद्यापीठाला शक्य झालं नाही. त्यामुळंच राज्यपालांनी ही कारवाई केल्याचं समजतंय.