मुंबई : धर्मा प्रॉडक्शनच्या कलंक सिनेमाने सोशल मीडियात धुमाकूळ घातला. कारण साजन खलनायक, थाणेदार सिनेमातून एकत्र झळकलेली आणि आपल्या अफेअरमुळे चर्चेत आलेली माधुरी दीक्षित-संजय दत्तची जोडी २१ वर्षांनंतर कलंक सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    जुन्या जोड्यांना सिनेमातून पुन्हा एकत्र आणण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही ब्रेकअप झालेल्या कपल्सने सिनेमात एकत्र काम केले आहे. रणबीर कपूर-दीपिका पदुकोण ही अतिशय लोकप्रिय जोडी. काही कारणास्तव खऱ्या आयुष्यात विभक्त झाली असली तरी ये जवानी है दिवानी, तमाशा सिनेमातून पुन्हा एकत्र आली.

  • सलमान खान आणि कतरिना कैफ खूप काळ एकत्र होते. मात्र एक था टायगर सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ही जोडी विभक्त झाली. तरी देखील तो सिनेमा त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर ५ वर्षांच्या दूराव्यानंतर टायगर जिंदा है सिनेमातून पुन्हा एकदा हे दोघे एकत्र झळकले. 

  • करिना कपूर-शाहीद कपूर यांचे रिलेशनशीप खूप चर्चेत राहीले. मात्र कालांतराने दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. आता दोघंही आपल्या वैयक्तिक आयुष्यात सेटल आहेत. पण अनुराग कश्यपच्या उडता पंजाब सिनेमाने दोघांना एकत्र आणले. सिनेमात एकत्र दिसले नसले तरी प्रमोशनच्या वेळी दोघेही एकत्र दिसून आले.

  • अक्षय कुमार आणि रवीना टंडन विभक्त झाल्यानंतर ते पुन्हा एकत्र येतील असे वाटले नव्हते. १९९९ मध्ये विभक्त जालेले हे कपल २००४ साली आलेल्या पुलिस फोर्स सिनेमात एकत्र झळकले.