मुंबई : अलीकडे आदित्य नारायणने त्याच्या लग्नाची घोषणा केली. तो 'शापित' फेम अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. ते दोघे १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्नाच्या बातमीनंतर आदित्य चांगलाच चर्चेत आला आहे. लग्नाबरोबरच चर्चा रंगत आहे ती म्हणजे त्याच्या कंगाल होण्याची. त्याच्या बँक अकाऊंटमध्ये केवळ १८ हजार रुपये शिल्लक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र या आफवा असल्याचं सांगत त्याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो म्हणाला, 'लॉकडाऊनपूर्वी मी एक घर खरेदी केले. एक सेलिब्रिटीअसून देखील मला घराच्या ईएमआय बद्दल विचार करावा लागत आहे. जर का ही महामारी अधिक काळ राहिली तर प्रत्येकाला नुकसानाचा सामना करावा लागण्याचं वक्तव्य त्याने केलं. 


शिवाय, याचा अर्थ असा होत नाही, की मी कंगाल झलो आहे. माझ्याकडे पैसा नाही. गेली दोन दशकं मी काम करत आहे. तर मी कंगाल कसा होवू शकतो? असा प्रश्न देखील त्याने याठिकाणी उपस्थित केला. एका मुलाखतीत त्याने याविषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. 


दरम्यान, एका न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार बँक अकाऊंटमध्ये केवळ १८ हजार रुपये शिल्लक असल्याचं सांगितलं जात होतं. शिवाय म्यूच्यूअल फंड्समध्ये जितके पैसे गुंतवले होते ते देखील आदित्यला पुन्हा काढून घ्यावे लागले आहेत, अशा अफावा पसरल्या होत्या. मात्र या चर्चांना खुद्द आदित्यने पूर्णविराम दिले आहे.