Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये दिसला. या वेळी आमिरनं त्याच्या करिअरसोबत त्याच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा किस्सा शेअर केला आहे. असाच पत्नी रीना दत्तानं एक खुलासा केला आहे. आमिरनं यावेळी सांगितलं की रीनाला लेबर पेन म्हणजेच प्रसुती कळा होत होत्या. त्यावेळी आमिर तिला श्वास घेण्यासाठी काही एक्सरसाइज शिकवण्याचा प्रयत्न करत होता आणि रीनानं त्याच्या कानशिलात लगावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या एपिसोडमध्ये जेव्हा कपिल शर्मानं त्याला विचारलं की तो एक अभिनेता म्हणून लोकं कसं वागतात त्याकडे लक्ष देत असतो. तो आमिर खाननं सांगितलं की "मी तुम्हाला कळावं म्हणून एक प्रसंग सांगतो जे मी नोटीस केलं. हा तो दिवस आहे जेव्हा जुनैदचा जन्म झाला होता. रीनाला प्रसुती कळा येत होत्या. आम्ही रुग्णालयात होतो आणि एका चांगल्या नवऱ्याच्या रुपात मी तिला श्वास घेण्याच्या काही एक्सरसाइज सांगत होतो. जेव्हा तिच्या कळा वाढल्या, मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तिनं मला कानशिलात लगावली, त्यानंतर मी म्हणालो, हा मूर्खपणा थांबव!' रीनाजीला खूप वेदना होत होत्या. तिनं माझा हातही चावला."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आमिरनं त्यावेळी जे पाहिलं त्याविषयी सांगितलं. "माझ्या जवळपास काय होत होतं हे सगळं मी लक्ष देऊन पाहू लागलो. तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप वेदना होतात... उदाहरण प्रसूतीच्या वेळी स्त्रियांना वेदना होतात. मी याविषयी काही विचार किंवा प्लॅन केला नव्हता. हे फक्त माझ्या बाबतीत घडलं. मी रीनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि जेव्हा ती वेदना अनुभवत होती... साधारणपणे आपल्याला वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या चेहरा वेदनांमुळे कसा बदलेल... पण असं नाही. जेव्हा कळा जास्त व्हायच्या तेव्हा तिच्या चेहऱ्यावर विचित्र बदल व्हायचे. त्यानंतर जेव्हा रीना जुनैदसोबत घरी आली तेव्हा मी तिला ही गोष्ट सांगितली." 


हेही वाचा : PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'


आमिर आणि रीनाच्या लग्नाला 16 वर्ष झाली आहेत. जेव्हा त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा विचार केला. तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. त्यानंतर आमिरनं किरण रावशी दुसरं लग्न केलं. मात्र, लग्नाच्या 15 वर्षांनंतर त्या दोघांचा देखील घटस्फोट झाला.