मुंबई : ऑक्टोबर 2021 मध्ये, सामंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली. हा सर्वांसाठी धक्का होता. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत असल्या तरी लोकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सामंथा प्रभूने याबाबत मीडियाशी चर्चा केली. आता पहिल्यांदाच नागा चैतन्य घटस्फोटावर उघडपणे बोलला आहे.


नागा चैतन्यचा बंगाराजू हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यांच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. यादरम्यान एका मुलाखतीत नागा चैतन्यला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचबरोबर नागाने यावेळी मौन सोडत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. नागा चैतन्य म्हणाला- "वेगळं असणं ठीक आहे.



त्यांच्या वैयक्तिक आनंदासाठी घेतलेला हा परस्पर निर्णय आहे. ती आनंदी असेल तर मी आनंदी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत घटस्फोट हा सर्वोत्तम निर्णय आहे." नागा चैतन्यचे हे उत्तर ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.


दोघांनीही गोव्यात कुटुंबीयांच्या संमतीने प्रेम विवाह केला. 2017 मध्ये या लग्नाची बरीच चर्चा झाली कारण ही अगदी शाही पद्धतीने पार पडलेलं लग्न होतं.  दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते आणि हे प्रेम त्यांच्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून येते पण 2021 मध्ये या घटस्फोटाच्या बातम्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले.



ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अशा बातम्या येऊ लागल्या की दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. आणि ऑक्टोबरपर्यंत हे सत्य असल्याचे सिद्ध झाले. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाआधीच समंथा आणि नागा यांनी घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना धक्कादायक बातमी दिली.


पण दोघांचा घटस्फोट नक्की कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही यावर मौन बाळगले आहे.