मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला बऱ्याच सेलिब्रिटी  कपल्सनी त्यांच्या नात्याला नव्या टप्प्यावर नेत लग्नगाठ बांधली. पण, अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी मात्र अद्यापही तशी कोणतीही घोषणा केली नाही. (Arjun Kapoor Malaika Arora)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंबहुना ही जोडी सध्या स्वत:च्याच वेगळ्या दुनियेत आनंदात असल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता म्हणे त्यांच्या या आनंदाला कोणाचंतरी गालबोट लागलं. 


डिनर डेट, लंच पार्टी, सक्सेस पार्टी इथपासून ते अगदी सुट्टीवर जाण्यापर्यंत एकमेकांची साथ देणारी ही जोडी सातत्यानं कपल गोल्स देत राहिली.


वयामध्ये असणाऱ्या फरकाची आपल्याला फिकीर नसल्याच्या आशयाचं वक्तव्य करत काही दिवसांपूर्वी अर्जुननं या नात्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. 


पण, आता मात्र चाहत्यांना धक्का देणारी एक बातमी प्रचंड चर्चेत आली आहे. ती म्हणजे या जोडीतील दुराव्याची. 


नेमकं सत्य काय? 
सूत्रांच्या माहितीनुसार मागील सहा दिवसांपासून मलायका तिच्या घराबाहेर पडलेली नाही. ती पूर्णपणे एकटी पडली आहे. 


असं म्हटलं जात आहे की, या प्रसंगी ती अतिशय निराश आहे, ज्यामुळं ती या जगापासून दूरच राहू इच्छिते. 


मुख्य म्हणजे अर्जुनही मलायकाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेला नाही. किंबहुना काही दिवसांपूर्वीच तो बहीण रिया कपूर हिच्या घरी डिनरसाठी गेला होता. 


रिया जिथे राहते तिथून काही अंतरावरच मलायकाचंही घर आहे. पण, तो तिथे गेला नाही.


मलायकासुद्धा सहसा अर्जुनसोबत कौटुंबीक भेटीगाठींना हजेरी लावते. पण, यावेळी मात्र ती तिथे नव्हती. 


अर्जुनही मलाय़काच्या घरानजीक असेल तेव्हा तिला भेटल्याशिवाय जात नाही. पण, यावेळी मात्र तसं घडलं नाही.


कुठे नाही, तर ही जोडी कॉफी डेटवर तरी जाते. पण, गेल्या काही दिवसांत मात्र असं काहीच पाहायला मिळालं नाही. ज्यामुळं त्यांच्यात काहीतरी बिनसलंय अशीच शक्यता वर्तवली जात आहे. 


येत्या काळात आता खुद्द मलायका आणि अर्जुन त्यांच्या या नात्याबाबत काय उलगडा करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.