मुंबई : काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने आपल्या मुलीचा आराध्याचा वाढदिवस साजरा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर नुकतेच तिने आपल्या स्वर्गीय वडिलांचा वाढदिवसाचा एक कार्यक्रम केला. यावेळी ऐश्वर्यासोबत आराध्या आणि काही लहान मुले उपस्थित होते. या कार्यक्रमात असं काहीतरी झालं ज्यामुळे ऐश्वर्या आपले अश्रू सांभाळू शकली नाही. भर कार्यक्रमात ऐश्वर्याला रडू अनावर झालं आणि ती रडू लागली. 


ऐश्वर्याने आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईतील एका एनजीओमध्ये गेली होती. आणि तिथे तिने कृष्णराज राय यांचा वाढदिवस साजरा केला. काही दिवसांपूर्वी कृष्णराज राय यांचे स्वास्थ अस्वास्थामुळे निधन झाले. 



ऐश्वर्या आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती. त्या दोघांमधील नातं हे अनोखं होतं. त्यांच्या निधनानंतर ऐश्वर्या खूप खचल्याच आपण साऱ्यांनीच पाहिलं. आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचा वाढदिवस लहान मुलांसोबत साजरा केला. या कार्यक्रमात ऐश्वर्याची आई देखील उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रमात गोंधळ झाल्यामुळे भावूक होऊन ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलं. हा काही पब्लिक इव्हेंट नाही किंवा प्रिमिअर शो नाही त्यामुळे कृपया तुम्ही शांत राहा अशी विनंती तिने उपस्थितांना केली.