Rajesh Khanna Dimple Kapadia : बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांच्या नात्याविषयी सगळ्यांना माहित आहे. त्यांची जोडी ही सगळ्यांची आवडती असली तरी देखील त्यांच्यात कुठे तरी दुरावा होता आणि याविषयी सगळ्यांना माहित होतं. त्यांच्यात आलेल्या दुराव्यामुळे ते दोघे वेगळे राहू लागले होते. पण त्या दोघांनी कधी घटस्फोट घेतला नाही. दरम्यान, त्यांच्या या वादात कधी डिंपल कपाडीया यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला का? असा विचार सगळ्यांना पडला होता. त्याविषयी डिंपल कपाडिया यांनी काय उत्तर दिलं ते जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिंपल कपाडिया यांचं जेव्हा राजेश खन्ना यांच्याशी लग्न झालं तेव्हा त्या फक्त 15-16 वर्षांच्या होत्या. इतकंच नाही तर त्यावेळी त्या करिअरच्या पीकवर होत्या. पण इतकं असताना देखील त्यांनी राजेश खन्ना यांच्याशी लग्न करून संसार करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या जवळपास फक्त 9 वर्षात डिंपल आणि राजेश खन्ना विभक्त झाले. ते दोघे 1982 मध्ये वेगळे राहू लागले होते. पण त्यांनी कधीच घटस्फोट घेतला नाही. 


दुसऱ्या लग्नावर करू लागल्या होत्या...


राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर डिंपल कपाडिया या दुसऱ्या लग्नाचा विचार करू लागल्या होत्या, असं म्हटलं जातं. पण दोघांमध्ये कोणीच कधी असा निर्णय घेतला नाही. 1994 मध्ये British Nandy ला दिलेल्या मुलाखतीत डिंपल कपाडिया यांनी दुसऱ्या लग्नावर वक्तव्य केलं. राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाले तरी त्यांच्यासाठी लग्न हे खूप महत्त्वाचं होतं. त्या म्हणाल्या जर लग्न व्यवस्थित राहत नाही तर याचा अर्थ ते चुकीचं आहे असं नाही. 


पुढे लग्नसंस्थेवर त्यांचा विश्वास आहे की नाही असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर उत्तर देत डिंपल म्हणाल्या, हो त्यांना लग्नसंस्थेवर विश्वास आहे. पुढे डिंपल यांना हे देखील विचारण्यात आलं की त्या पुन्हा एकदा लग्न करण्यावर विचार करतील का? तर त्यावर त्यांनी पुन्हा सांगितलं की त्यांना मुक्तपणे जगायला आवडतं. पण मग तरी त्या दुसऱ्या लग्नावर विचार करतील. 


हेही वाचा : 23 वर्षीय लेक गमावल्यानंतर अभिनेत्रीची भावूक पोस्ट! मन हेलावून टाकणारे 5 शब्द


त्या पुढे म्हणाल्या, मला माहित नाही की मी कसं काय एडजस्ट करेन, कारण मला स्वत: मध्ये राहण्याची सवय झाली आहे. पण हो मला दुसरं लग्न करायला आवडेल.