मुंबई : 'अग्गंबाई सासूबाई' मालिका पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत. अभिजित सगळी प्रॉपर्टी सोहम च्या नावाने करून अभिजित आणि आसावरी घर सोडून निघून जातात आणि आपला एक वेगळा संसार थाटतात, शुभ्रा ही त्यांना सोहमच्या नकळत मदत करत असते. पण आता जसजशी मालिका पुढे जातेय मालिकेत खूप घडामोडी घडणार आहेत, ही मालिका एका निर्णायक वळणावर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण त्यांना लवकरच अनुभवता येणार आहे कारण त्यांचा आवडता बबड्या आता सुधारणार आहे. कूकिंग स्पर्धेनंतर आसावरी ने केलेल्या भाषणातून सोहम ला खूप भरून येत त्याच्या डोळ्यात पाणी येत आपण कुठेतरी चुकलो याची त्याला जाणीव होते आणि तो मनापासून आई ची माफी मागतो.



पण सोहमवर चिडलेली आसावरी सोहम ला माफ करणार का? सोहमला त्याने केलेल्या चुकांची उपरती होणार का? आणि पुन्हा अभिजित - आसावरी परत आपल्या घरी जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पाहायला विसरू नका हा High Voltage Drama सोमवार ते रविवार रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.