मुंबई : झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेने अगदी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील आसावरी आणि अभिजीत म्हणजे निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेने आता वेगळंच वळण घेतलं आहे. आसावरी आणि अभिजीत राजे आपलं प्रेम सगळ्यांसमोर मान्य करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोहम आईचं म्हणजे आसावरीचं अभिजीत राजेंवर प्रेम असल्याचं आजोबांना सांगतो. आजोबा आसावरीवर खूप भडकतात. आणि तिला उंबरठा न ओलांडण्याचा आणि स्वयंपाक घरात न जाण्याचा आदेश देतात. तरीही अभिजीत राजे आसावरीवर मनापासून प्रेम करतात. 


आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिजीत राजे आसावरीच्या बिल्डींग खाली तंबू ठोकून ठाण मारतात. अभिजीत राजेंना तेथून हटवण्याचे अनेक प्रयत्न आजोबांनी केले. पण आसावरीच्या प्रेमळ शब्दांनी अभिजीत राजेंना विश्वास दिला आणि अभिजीत राजे आसावरीची आजन्म वाट पाहायला तयार झालं. 



आसावरी अभिजीत राजे या विषयावरच बोलायला तयार नसते. पण शेजारच्या काकू दिला अभिजीत राजेंशी लग्न करण्याचा सल्ला देते. आज या वयात सगळ्यांच करण्यात वेळ जातो. पण वय झाल्यावर आपण एकटे पडतो अशी भावना त्या आसावरीकडे व्यक्त करतात. 


असं सगळं असताना शुभ्रा आजोबांनी तुम्हाला कधी आजीची आठवण येत नाही का? असा सवाल करून त्यांना एकटेपणाची जाणीव करून देते. आसावरीच्या या प्रश्नावर आजोबा उपाय म्हणून लग्नासाठी एक मुलगा निवडतात. 



याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. आजोबा आसावरीला मुलगा आवडला का? असा प्रश्न करतात. आजोबा आसावरी-अभिजीत यांचं नातं स्विकारत नाहीत. पण आसावरीसाठी नवीन मुलगा शोधतात. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे कळंत नाही.