मुंबई : अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहेत. दोघांच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अजय आणि काजोलने लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट केलं होतं. त्यावेळी करिश्मा कपूरचंही जबरदस्त स्टारडम होतं. असं म्हटलं जातं की, काजोलच्या आधी अजय देवगण करिश्मा कपूरवर प्रेम करत होता आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याच दरम्यान काजोलच्या एंट्रीने सगळा गेमच बिघडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिन्ही स्टार्समधील लव्ह ट्रँगल चर्चेत होता
९० च्या दशकात अजय देवगण, काजोल आणि करिश्मा कपूर यांची गणना मोठ्या स्टार्समध्ये होते. तिघांच्या लव्ह ट्रँन्गलचीही खूप चर्चा झाली होती. 'जिगर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण आणि करिश्मा कपूर खूप जवळ आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरपूर्वी अजय देवगण रवीना टंडनला डेट करत होता.


'जिगर' नंतर अजय देवगण आणि करिश्मा कपूर 'सुहाग', 'धनवान' आणि 'सरगम'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. एकत्र चित्रपट करत असताना दोघंही एकमेकांसोबत बराच वेळ घालवत असत आणि खूप जवळ आले. पण याच दरम्यान अजय देवगणच्या आयुष्यात काजोलची एन्ट्री झाली. दोघांनी 1995 साली 'हलचल' चित्रपटात काम केलं. या सिनेमाच्या दरम्यान काजोलला अजय देवगणचा स्वभाव आवडला आणि यानंतर या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली.  


जेव्हा त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं
असं म्हटलं जातं की, त्या दिवसांत काजोल तिचा मित्र कार्तिक मेहताला डेट करत होती, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. या दोघांचं ब्रेकअप झालं. यानंतर काजोलची मैत्री अजयसोबत झाली. यानंतर  चांगले मित्र असल्याने काजोल आणि अजय देवगण अनेकदा त्यांचे विचार एकमेकांसोबत शेअर करत. या काळात त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. रिपोर्ट्सनुसार, एकदा काजोल आणि अजय देवगण एकत्र बसले होते, तेव्हा करिश्मा कपूरने अजय देवगनला फोन केला. कॉलवर मुलीचा आवाज ऐकून काजोलला खूप राग आला.


यानंतर अजय देवगणने काजोलवरील प्रेम स्वीकारलं आणि त्यानंतर करिश्मा कपूरने अभिनेत्याचे आयुष्यातून एक्झिट घेतली. अजय देवगण आणि काजोल यांनी फेब्रुवारी 1999 मध्ये लग्न केलं. दोघांना दोन मुलं असून त्यांची नावे नीसा देवगण आणि युग देवगण आहेत.