मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथाने नुकतीच बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण ७' (Koffee With Karan 7) मध्ये हजेरी लावली होती. समांथा आता फक्त दाक्षिणात्य अभिनेत्री नाही तर तिचं नाव देशातल्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आहे. संपूर्ण देशातील अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव पहिलं यावं त्यासाठी तिनं काय केलं याचा खुलासा समांथाने 'कॉफी विथ करण' या शोमध्ये केला आहे.
 
आलिया भट्ट( Alia Bhatt), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये मागे टाकण्यासाठी समंथाने असे काही केले की ऐकून सगळेच थक्क झाले. अलीकडेच, PR एजन्सी Ormax ने जून 2022 चे रेटिंग दिले आहेत, ज्यामध्ये जून महिन्यात देशातील Top 10 लोकप्रिय अभिनेत्री कोण आहेत हे सांगण्यात आलं आहे. या यादीत दाक्षिणेतील कलाकारांचाही समावेश आहे. या रेटिंगमध्ये, Ormax Stars India Loves- सर्वात लोकप्रिय महिला सेलिब्रिटी, समांथा पहिल्या क्रमांकावर आहे आणि आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर नयनतारा (Nayantara) तिसऱ्या क्रमांकावर असून या यादीत काजल अग्रवाल, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, अनुष्का शेट्टी या अभिनेत्रींचा समावेश आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या यादीत आलियाला दुसऱ्या क्रमांकावर आणि समांथाला पहिल्या क्रमांकावर पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं असेल. तर कॉफी विथ करणमध्ये करणने हा प्रश्न विचारता समांथाने उत्तर दिले की तिने या यादीत पहिल्या स्थानी  येण्यासाठी 'Ormax'ला पैसे दिले आहेत. शोची सुरुवात झाल्यानंतर काही वेळात करणनं ही लिस्ट स्क्रीनवर दाखवली आणि म्हणाला, समांथाने कपूर खानदानाची सून आलिया भट्टला मागे टाकलं. तर, या यादीत पहिल्या स्थानी येण्यासाठी तिनं पीआर एजन्सीला पैसे दिल्याचं समांथानं कबूल केलं आहे. हे वाक्य समांथा तीनवेळा वेळा बोलली. 


दरम्यान, या आधी समांथानं तिच्या आणि नागा चैतन्यच्या नात्याविषयी आणि त्याचसोबत त्यांच्या घटस्फोटाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. काही वर्षे डेट केल्यानंतर समांथा रुथ प्रभूने 2017 मध्ये नागा चैतन्यसोबत लग्न केलं होतं. पण 2 ऑक्टोबर 2021 रोजी समांथा आणि नागा यांचा घटस्फोट झाला. त्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी कशा भावना आहेत या विषयी विचारता समांथा म्हणाली, 'सध्या आमच्या मनात एकमेकांबद्दल तीव्र भावना आहेत. म्हणजे आता जर तुम्ही आम्हा दोघांना एका खोलीत बंद केलं तर तुम्हाला आमच्यापासून  धारदार गोष्टी लपवाव्या लागतील. सध्या परिस्थिती चांगली नाही. कदाचित भविष्यात काहीतरी बदलेल.