Amitabh Bachchan and Aishwarya Rai Bachchan: 2005 साली आलेला 'बंटी ओर बबली' हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. या चित्रपटाचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. या चित्रपटातील एक गाणं हे आजही प्रचंड लोकप्रिय आहे ते म्हणजे 'गजरा रे हैं' गाणं. या गाण्याची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळाली होती. यावेळी केबीसीच्या एका एपिसोडमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या गाण्याची एक आठवण सांगितली आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. कौन बनेगा करोडपती हा शो सध्या सर्वत्र गाजतो आहे. सध्या सुरू असलेला हा केबीसीचा 15 वा सिझन आहे. यावेळी केबीसीमध्ये एका एपिसोडमध्ये बरीच गंमतजंमत पाहायला मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणा येथील अभिषेक गार्ग यांनी स्पर्धक म्हणून हजेरी लावली होती. 12,50,000 रूपयांसाठी त्यांना 12 वा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे त्यांनी योग्य उत्तर दिले आणि त्यांना ही रक्कम जिंकता आली. यावेळी हा प्रश्न होता तो म्हणजे पियुष मिश्रा यांचा बॅण्ड बाल्लीमारान (Ballimaaraan). यावेळी अभिषेक बिग बींना प्रश्न विचारतात की, बाल्लीमारान हा शब्द 'कजरा रे' या गाण्यातही घेण्यात आला होता. या गाण्यावर ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी डान्स केला होता. त्यावेळी ही आठवण सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ''आम्ही तिघं त्यावेळी या गाण्यात होतो पण तेव्हा ऐश्वर्या आमची सून नव्हती. आता आहे. माझी सून, मी आणि अभिषेक या गाण्यात होते. या गाण्यात खूप चांगले बोल होते.''


हेही वाचा : Dream Girl 2 Movie Review: आयुष्यमान खुरानाची 'ड्रीम गर्ल' भावली! देसी विनोदाची ठसकेबाजी अन् बरंच काही


अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन हे अनेकदा एकत्र चित्रपटात दिसले आहेत. 'पा', 'बंटी और बबली', 'दिल्ली - 6' अशा काही चित्रपटांतूनही ते एकत्र दिसले होते. त्यांच्या या Duo जोडीला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. 'बंटी और बबली' या चित्रपटातूनही त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांच्या या 'कजरा रे' गाण्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या गाण्यात ऐश्वर्या राय बच्चनचा कॉमियो होता. 


'कौन बनेगा करोडपती' ही मालिका गेले अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. गेल्या वीस वर्षात या मालिकेनं अनेकांनी लखपती आणि करोडपती केले आहे. या मालिकेनं अनेकांच्या आनंदाचा वाटा वाढवला आहे. तर अनेकांना फार मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिले आहे. त्यामुळे या शोची खासियत फार आहे. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादात सुरू आहे.