मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाबद्दल तुफान चर्चा रंगत आहे. लग्नासाठी सोमवारी विकी आणि कतरिना कुटुंबासोबत जयपूरला रवाना झाले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा रिसॉर्टमध्ये विवाह संपन्न होणार आहे. पण लग्नाआधी विकी आणि कतरिना वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधोपूर एका वकिलाने कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यासह हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नेत्रबिंद सिंह जदौन यांनी सांगितले की, 'हॉटेल सिक्स सेन्स व्यवस्थापनाने 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत चौथ माता मंदिराचा मुख्य रस्ता बंद ठेवला आहे. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्रास होत आहे.'



चौथ माता मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे, ज्यामध्ये दररोज अनेक भाविक दर्शन आणि आरतीसाठी येतात. भाविकांच्या भावना आणि समस्या लक्षात घेऊन वकिलांच्या वतीने माधोपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


त्यामुळे भक्तांच्या भावना लक्षात घेऊन मार्ग सुरळीत सुरू करण्याची मागणी वकिलांनी अर्ज सादर करून केली आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे.