मुंबई : टीव्ही जगतातील कॉमेडियन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारती सिंगने इंडस्ट्रीत आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. ती नेहमीच दमदार अँकरींग करत कार्यक्रमात बहार आणते. भारती तिच्या विनोदाच्या टाईमिंगने लोकांना खळखळवून हसवते. मात्र, प्रत्येक स्टारप्रमाणेच भारतीनेही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जास्त वजनामुळे ती इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करू शकेल असे भारतीला कधीच वाटले नव्हते. पण तिच्या विनोदी अभिनयानं लोकांची अशी मनं जिंकली की आता तिच्याकडे शोची रांग लागली आहे. काही वर्षांपूर्वी एका शोमध्ये पाहुणी म्हणून आलेल्या भारतीने तिला वाटणाऱ्या असुरक्षिततेबद्दल खुलेपणाने सांगितले.


भारती म्हणाली होती की, ती कॉलेजमध्ये असतानाही तिच्या प्रेमात कुणी पडलं नाही. तिला कुणीही प्रपोज केलं नाही. कारण भारती मुलांप्रमाणे टी-शर्टमध्ये कॉलेजला जायची. ती इतर मुलींसारखी हॉट नव्हती.



इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतरही भारतीला कोणत्या मुलाने त्या नजरेने पाहिले नाही, सगळे तिला फक्त क्यूट म्हणायचे. शोमध्ये कॉमेडियनने सांगितले की, जेव्हा शाहरुख खानने तिला पहिल्यांदा किस केले तेव्हा ती थक्क झाली होती.