मुंबई : टीव्ही रिऍलिटी शो बिग बॉसमध्ये प्रत्येक सिझनमध्ये एक ना एक कपल हे असतंचय. या सिझनमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या जोडीने चाहत्यांचं मनोरंजन केलंय. यांची जोडी चाहत्यांना खूप पसंत आली आहे. मात्र आता शोमध्ये असं काही झालंय ज्यामुळे दोघांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बिग बॉसमध्ये टिकट टू फिनालेची चर्चा आहे. यावेळी राखी सावंतनंतर दुसरा फायनलिस्ट शोधला जात आहे. या रेसमुळे अनेक नाते तुटताना दिसणार आहे. 


या यादीत करण आणि तेजस्वीच्या नावाचा समावेश आहे. निदान शोचा लेटेस्ट प्रोमो बघितला तरी एवढंच वाटतं. शोच्या प्रोमोमध्ये करण आणि तेजस्वी यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळते. या भांडणाच्या वेळी तेजस्वी रागाने असे काही बोलते. जे ऐकून करण ढसाढसा रडू लागतो.



तेजस्वी करणला सांगते की तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाहीस. यानंतर निशांत भट्टजवळ बसून करण खूप रडतो आणि म्हणतो की, ज्या मुलीसाठी तो ८ महिने उभा होता. त्याने शेवटी प्रेमावर प्रश्न उपस्थित केले. आधी तुम्ही हा व्हायरल प्रोमो पहा....



सीझनच्या सुरुवातीपासूनच करण आणि तेजस्वीची जोडी लोकांना पसंत केली जात आहे. मात्र, आता लेटेस्ट प्रोमो पाहून चाहते नाराज होऊ शकतात. जर आपण या सीझनबद्दल बोललो तर, सध्या सीझनला राखीच्या रूपात पहिला फायनलिस्ट मिळाला आहे आणि लवकरच शोला या सीझनचा दुसरा फायनलिस्ट देखील मिळू शकतो. बरं, या सीझनच्या अंतिम फेरीत तुम्हाला कोणाला पाहायचं आहे? कमेंट करून सांगा..