मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी त्यांच्या नात्याची ग्वाही दिली. माध्यमांसमोर नात्याचा स्वीकार करत याच माध्यमांच्या सहकार्यासाठी त्यांचे आभार मानणाऱ्या अर्जुनचा अनेकांनाच अभिमान वाटला. नात्याची अधिकृत माहिती दिल्यानंतर आता अर्जुन आणि मलायकाने गुपचूप गुपचूपच एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. कोणता बरं निर्णय असेल तो? हाच प्रश्न तुम्हालाही पडत आहे ना?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा निर्णय लग्नाचा तर नाही.... अशी शंकाही तुमच्या मनात घर करुन गेली असेल. पण, मुळात तसं नाही आहे. लग्नाचा सध्या विचार नसल्याचं अर्जुनने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे इथे तो मुद्द्चा उपस्थित होत नाही. अर्जुन आणि मलायकाने सध्याच्या घडीला माध्यम आणि एकंदर गोंधळाच्या वातावरणातून दूर जाण्याचा निर्णय या दोघांनीही घेतल्याचं कळत आहे.



सोमवारी रात्री उशिरा त्यांना मुंबई विमानतळांवर पाहिलं गेलं. सुट्टीनिमित्त एकमेकांसोबत काही क्षण व्यतीत करण्यासाठी म्हणून ते दोघंही बाहेर गेल्याचं म्हटलं जात आहे. ते कुठे गेले आहेत ही बाब मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. 



अर्जुन आणि मलायका एकत्र विमानतलावर दिसताच त्यांचे फोटो व्हायरल झाले आणि चाहत्यांनी विविध अंदाज बांधण्यास सुरुवात केली. २६ जूनला अर्जुनचा वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने ही जोडी कोणा एका निवांत ठिकाणी गेली असल्याचं म्हटलं जात आहे. निमित्त काहीही असो, व्यग्र वेळापत्रकातूनही या दोघांचं एकमेकांना प्राधान्य देण्याचा अंदाज अनेकांची मनं जिंकत आहे हेसुद्धा तितकच खरं.