मुंबई :अभिनेता सलमान खान आणि त्याचं कुटुंब हिंदी कला जगतामध्ये कायमच चर्चेत असतं. सलमानचे वडील, त्यांच्या पत्नी, त्याची भावंड, त्यांची मुलंबाळं असा हा एक मोठा खान परिवार. कुटुंब मोठं, तितकेच इथं पार पडणारे कार्यक्रमही मोठे. जबाबदाऱ्याही मोठ्याच. (Bollywood Actor Salman Khan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत अभिनेता सलमान खान त्याच्या कुटुंबातील सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावताना दिसला. प्रत्येकाची काळजी घेताना दिसला. पण, आता मात्र तो या साऱ्यापासून दूर जाताना दिसत आहे. 


असं नेमकं का हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? सूत्रांच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षीच समाननं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. हा निर्णयही थेट ईदच्याच वेळी घेण्यात आला आहे. 


असं म्हटलं जातंय की सलमाननं जबाबदारी सोपवल्यामुळं त्याची बहीण प्रचंड मेहनत घेताना दिसली. यामध्ये तिला पती आयुष शर्मा याचीही  साथ मिळाली. ईदच्या पार्टीचं आयोजन करण्याचा मोठा भार सलमाननं त्याच्या बहिणीवर सोपवला. (Eid celebrations )


ज्यामुळं अर्पिता आणि तिचा पती आयुष या दोघांनीही सोमवारपासूनच पाहुण्यांना आमंत्रणं पाठवण्यास सुरुवात केली. अर्पिताच्याच नव्या घरी ईदची पार्टी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


बऱ्याच बी- टाऊन सेलिब्रिटींची या पार्टीला हजेरी असेल शिवाय भाईजानचे खास मित्रही पार्टीला येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अर्पितानं सलमानच्या सांगण्यावरून पार्टीसाठी सर्वोत्तम सजावट, खाद्यपदार्थांची व्यवस्था आणि इतरही बरेच जंगी बेत आखले आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून सलमान त्याच्या आगामी चित्रपट आणि काही इतर प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. काही नव्या चेहऱ्यांच्या लाँचिंगसाठीसुद्धा तो तयार आहे. ज्यामुळं कामाचा काही भार त्यानं बहिणीवर सोपवल्याचं म्हटलं जात आहे. 


अर्पितानंही भावाच्या सांगण्यावरून त्याला हातभार लावण्यासाठी म्हणून अगदी सहजपणे या जबाबदाऱ्या स्कीकारल्या आहेत. तेव्हा आता ती या साऱ्यामध्ये यशस्वी ठरते का हे पाहणं महत्त्वाचं.