मुंबई : नवरात्र उत्सवाची धामधूम सध्या देशभरात आहे. प्रत्येकजण श्रद्धेने, भक्तीभावाने ९ दिवस देवीची आराधना करतो. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे अनेक सिनेमा आहेत जे आजही लोकांच्या स्मरणातून गेले नाहीत. नवरात्रीच्या या शुभदिनी आपण अशा सिनेमांची एक सफर करु.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) जय संतोषी माँ (१९७५ ):  या चित्रपटातल नायिका सत्यवती ही संतोषी मातेची मोठी भक्त आहे. सत्यवतीवर जेव्हा दु: खाचा डोंगर कोसळतो तेव्हा ती संतोषी मातेला साकडे घालते. तिची परीक्षा घेऊन आई तिच्या साहाय्यासाठी स्वतः पोहोचते असे यात दाखविण्यात आले आहे.



२) सुहाग (१९७९ ) : या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रमुख भूमिका आहे. यातील 'मा शेरावली'हे गाण भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. चित्रपटातील हिरो अमिताभ बच्चनला नवरात्री दरम्यान  मारण्यासाठी शत्रू येतात. पण आईच्या कृपेने  शत्रूंचा नाश करतो.



३). माॅ (१९९२): जितेंद्र आणि जया प्रदा यांचा १९९२ मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा. या चित्रपटात जया प्रदाचा मृत्यू झाला आणि ती आत्मा बनून स्वतःच्याच घरात राहत असते. तिचे संपूर्ण लक्ष मुलांच्या संगोपनावर आहे.  दुर्गा मातेच्या कृपेने आपल्या मुलाला वाचवण्यामध्ये जया बच्चन यशस्वी होते.



४) अवतार (१९८३): १९८३ मधील या सिनेमात हिरो राजेश खन्ना आणि त्यांची पत्नी शबाना आझमी आपल्या मुलाच्या बिघडलेल्या स्थितीमुळे अस्वस्थ झाले. म्हणूनच ते मुलांबरोबर वैष्णोदेवीच्या मंदिरात जातात.   त्यांचे मूल आईच्या कृपेने बरे होते.



५) प्लेअर ऑफ द प्लेयर (१९९२ ): अक्षय कुमार आणि फिल्मी अंडरटेकरच्या लढाईत तो देवीकडे शक्ती मागतो. देवीच्या कृपेने एक धोकादायक लढाईत त्याला विजय मिळतो.