मुंबई : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुषने पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी 17 जानेवारी रोजी रात्री उशिरा त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून त्यांचा घटस्फोट झाल्याची माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनुषच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे. 18 वर्षांचं नातं संपुष्टात यायला नेमकं असं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी लोकं आतूर आहेत. या संदर्भात धनुष किंवा ऐश्वर्या दोघांकडूनही असं कोणतंही विधान समोर आलेले नाही. ज्यामध्ये दोघं वेगळे का झाले हे सांगितलं गेलं असलं तरी दोघांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या विभक्त होण्यामागचं कारण सांगितलं आहे.


एका मीडिया हाऊसशी बोलताना या कपलच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितलं की, 'धनुष खूप वर्कहॉलिक आहे. जो कोणी त्याला ओळखतो तो सांगू शकतो की धनुष त्याच्या कामाला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा खूप जास्त महत्व देतो. आऊटडोअर शूटिंगमुळे धनुष आपल्या कुटुंबापासून दूर राहतो तेव्हा अनेकदा असं घडतं. तो नेहमी स्वतःला कामात गुंतवून ठेवतो.


याशिवाय धनुष खूप खाजगी व्यक्ती आहे, तो त्याच्या मित्रांसोबतही त्याच्या जास्त गोष्टी शेअर करत नाही. त्याच्या मनात काय चाललं आहे ते कुणाच सांगू शकत नाही. जेव्हाही धनुष आणि ऐश्वर्यामध्ये भांडण व्हायचं किंवा दोघांमध्ये काही मतभेद निर्माण व्हायचे, तेव्हा ते स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी चित्रपट साईन करायचा.


बिघडलेल्या नात्याचा ताण टाळण्यासाठी धनुष नेहमी स्वतःला व्यस्त ठेवतो. गेले 6 महिने या कपलसाठी खूप कठीण गेले. धनुष आणि ऐश्वर्याच्या मनात खूप दिवसांपासून वेगळं होण्याचा विचार सुरू होता. घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यापूर्वीच दोघांमध्ये खूप चर्चा झाली होती. 'अतरंगी रे'चे प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर त्याने घटस्फोटाची घोषणा करावी', अशी धनुषची इच्छा होती.