Amitabh Bachchan-Jaya Bachchan Marriage: 1973 मध्ये अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न केले. आता या त्यांच्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. लग्नापूर्वी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन काही काळ एकमेकांना डेट करत होते. पण तुम्हाला माहित आहे का की अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्यामुळे जया बच्चन यांच्याशी लग्न केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांनी सिमी गरेवाल यांचा सुपरहिट शो 'रेन्डेव्हसमध्ये स्वतःची आणि जया बच्चनची प्रेमकहाणी सांगितली होती. एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर त्यांनी जया बच्चनचा फोटो कसा पाहिला आणि त्यांना तिच्यावर विश्वास कसा बसला हे त्यांनी सांगितले होते. बिग बींनी खुलासा केला होता की त्यांना जया बच्चनचे डोळे खूप आवडतात. जया यांनी 1970 मध्ये पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा पाहिले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने त्या प्रभावित झाल्या.


जया आणि अमिताभ बच्चन यांची भेट


अमिताभ बच्चन आणि जया यांची पहिली भेट ही 'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात दोघांनाही कास्ट करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची मैत्री झाली. यानंतर दोघांनी 'एक नजर' चित्रपटात एकत्र काम केलं. तेव्हा पासून ते एकमेकांवर प्रेम करू लागले. अमिताभ बच्चन हे जया यांना त्यांचे मित्र चंद्रा बारोट यांच्या घरी गुप्तपणे भेटायचे.


बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या 'जंजीर' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया यांनी काम केले होते. या आनंदात चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी 'जंजीर' चित्रपटातील स्टारकास्टला परदेश दौऱ्यावर नेण्याचा निर्णय घेतला. मात्र बिग बींचे वडील हरिवंशराय बच्चन यांना हे आवडले नाही आणि त्यांनी एक अट घातली.


या अटीमुळे करावे लागले लग्न


जर अमिताभ बच्चन यांना जयासोबत परदेशी दौऱ्यावर जायचे असेल तर आधी लग्न करावे लागेल. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि त्यांनी दक्षिण मुंबईतील एका मंदिरात जयासोबत गुपचूप सात फेरे घेतले. यावेळी त्यांच्या लग्नात जवळचे नातेवाईक सहभागी झाले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे मित्र चंद्रा बारोट यांनी अमिताभ बच्चन यांना गुप्तपणे लग्न करण्याची कल्पना दिली होती.