Urvashi Rautela on Marriage Purpose : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या रिषभ पंतमुळे चर्चेत आली आहे. परंतु तिने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतील वक्तव्यामुळे सध्या सगळीकडे एकच खळखळ उडाली आहे. या मुलाखतीत उर्वशीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीने सांगितले की तिला एक लग्नाचा प्रस्ताव आला होता. एका इजिप्तशियन गायकाने हा प्रस्ताव दिला होता. पण हा इजिप्तशियन गायकाचे आधीच एक लग्न झालं होतं आणि त्याला 4 मुलंही आहेत. उर्वशीच्या म्हणण्यानुसार, या ऑफरचा तिला धक्काच बसला होता आणि प्रस्तावावर काय उत्तर द्यावे हेच तिला काही कळतं नव्हते. पण तिने मात्र तिला आलेली ही लग्नाची ऑफर फेटाळून लावली होती.  


उर्वशीने पुढे सांगितले की ती दुबईमध्ये त्या गायकाला भेटली होती तिथेच तिला त्याच्या लग्नाचा प्रस्ताव आला होता. उर्वशी म्हणाली की, ''आमच्या दोघांचेही cultural वेगळे आहे त्यामुळे मी त्याला नकार दिला'', असे तिने सांगितले. 


काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने क्रिकेटर ऋषभ पंतच्या नावाने चर्चेत आली होती. उर्वशीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ''मी एका शोसाठी दिल्लीला पोहोचले होते आणि तिथे ऋषभ पंत मला भेटण्यासाठी बराच वेळ वाट पाहत होता. जेव्हा मी दिल्लीला पोहोचले तेव्हा मी खूप थकले होते आणि त्यामुळे मी त्याला भेटू शकले नाही.'' उर्वशीच्या या मुलाखतीनंतर काय तर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला होता.


ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर तिला याच प्रकरणाला उद्देशून एक स्टोरी टाकली आहे की, ''लोक थोडी लोकप्रियता मिळविण्यासाठी कसे खोटे बोलतात.'' ऋषभ पंतच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोघांचेही बरेच मीम्स व्हायरल झाले होते. 


या वर्षी रिलीज झालेल्या 'ऐ दिल है ग्रे' चित्रपटात उर्वशीने काम केले आहे. चित्रपटात अभिनेता अक्षय ओबेरॉय आणि विनीत कुमार सिंह यांच्या प्रमुख भुमिका होत्या.