मुंबई : तेरी आंखों के दरियां का उतरना भी जरूरी था, मोहब्ब्त भी जरूरी थी बिछड़ना भी जरूरी था… हे गाणं गौहर खान आणि कुशल टंडनवर चित्रित करण्यात आलं होतं. म्हणून हे माहित होतं की, हे त्यांच्या दोघांच्या आयुष्यातील कटू सत्य ठरेल. आज जरी या दोघांचे मार्ग वेगळे झाले असले तरी आज हे दोघेही आप-आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. आजही दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पण एक काळ होता जेव्हा ही दोन नावं एकमेकांशी जोडली गेली होती. आणि त्यांच्या प्रेमाच्या सर्वत्र चर्चा होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघांची जोडी  बनली  बिग बॉसमध्ये
गौहर खान आणि कुशल टंडन दोघंही बिग बॉस 7 मध्ये स्पर्धक म्हणून पोहोचले होते. घरात राहत असताना दोघंही चांगले मित्र झाले आणि त्यांची केमिस्ट्री बघून सर्वत्र चर्चा होऊ लागल्या. घराबाहेर पडलेले दोघंही रिलेशनशिपमध्ये आले होते. लोकांनाही ही जोडी खूप आवडायला लागली होती. ते सगळीकडे एकत्र दिसू लागले. विशेष गोष्ट म्हणजे गौहर खान कुशल टंडनपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. पण या वयातील अंतर दोघांमध्ये कधीच आलं नाही. दोघंही 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण नंतर त्यांच्या नात्यातील अंतराच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.


 


सोशल मीडियावर ब्रेकअपबद्दल सांगितलं होतं
एक दिवस कुशल टंडनने सोशल मीडियावर लिहिलं की, त्यांचे आणि गौहर खानचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. दोघंही आता एकत्र नाहीत. जेव्हा त्याच्या चाहत्यांनी ही बातमी वाचली तेव्हा त्यांनादेखील धक्का बसला आणि ही बातमी बऱ्याच काळापासून मनोरंजन विश्वात होती. पण दोघांचं भेटणं जितकं आवश्यक होतं तितकंच कदाचित वेगळे होणेही होतं. तितकंच अपरिहार्य होतं. कारण आजही दोघंही आपापल्या आयुष्यात खूप आनंदी आहेत. कुशल टंडन त्याच्या आयुष्यात व्यस्त आहे, गौहर खानने जैद दरबारशी लग्न केलं आहे आणि तो त्याच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.