मुंबई : 'ड्रीम गर्ल' म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांना आजही एका गोष्टीची भीती सतावते. अशात हेमा मालिनी यांना नक्की कोणत्या गोष्टीची भीती सतावते? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.  हेमा यांना ज्या गोष्टी भीती वाटते, ती गोष्ट आपण देखील मुंबईच्या रस्त्यांवर अनुभवली आहे. हेमा मालिनी यांनी मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची भीती वाटते. मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे पाहून अभिनेत्री हेमा मालिनी यांनी संताप व्यक्त केला आहे.
 
यावेळी हेमा यांनी मुंबईच्या रस्त्यांची तुलना थेट मथुरा-दिल्लीतील रस्त्यांसोबत केली आहे. ई-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी संताप व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा म्हणाल्या, 'मीरा रोड ते जुहू पर्यंत येताना मला दोन तास लागले. मुंबईच्या रस्त्यांवरुन एखादी गर्भवती महिला प्रवास कसा करणार? याचा मी विचारच करु शकत नाही. मी प्रवास करतना घाबरले.' 


पुढे हेमा यांनी मुंबईच्या रस्त्यांची तुलना मथुरा आणि दिल्लीच्या रस्त्यांसोबत केली आहे. ' दिल्ली-मथुरामध्ये देखील बरीच वाहतूक कोंडी व्हायची. पण आता परिस्थिती सुधारली आहे. '


'याआधी मुंबईची परिस्थिती अशी नव्हती. मुंबई काय होती, आता काय झाली...' असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी मुंबईच्या रस्त्यांबाबत बोलताना दिसतात.