मुंबई : शहनाज गिलचा गुरू सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटातून माघार घेत आहे का? शहनाज या चित्रपटात दिसणार नाही का? शहनाज गिलही आयुष शर्माप्रमाणे चित्रपट सोडणार आहे का? आजकाल हे प्रश्न खूप उपस्थित होत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे चित्रपटात होणारा फेरबदल. नाराज शहनाजनेही चित्रपटाला अलविदा करण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहनाजने सुरु केलं शूटिंग
अलीकडेच अशी बातमी समोर आली होती की, शहनाज गिल 'कभी ईद कभी दिवाली'चा भाग होणार आहे. ती आयुष शर्मा सोबत या सिनेमात स्क्रिन शेअर करणार होती. काही वेळापूर्वी तिने या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. मात्र आता बातम्या येत आहेत की, तिनेही नाराज होऊन चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तिला चित्रपटात होत असलेल्या बदलांची कोणतीही माहिती नव्हती. तसंच ती सध्या चित्रपटाच्या नकारात्मक प्रसिद्धीबद्दल खूप नाराज असल्याचंही बोललं जात आहे.


आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांनीही चित्रपट सोडला
शहनाजपूर्वी आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांनीही या चित्रपटापासून स्वत:ला वेगळं केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवयचा झाला तर आयुष शर्मा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्यात कोणतेही वाद नव्हते. त्यानंतर सलमान खानच्या सांगण्यावरून आयुषने चित्रपटातून माघार घेतली. त्याचबरोबर, आयुषचं पात्र जस्सी गिलला ऑफर करण्यात आलं होतं आणि आता चित्रपटात त्याची एंट्री झाल्याचं बोललं जात आहे. आता शहनाज खरंच चित्रपट सोडणार का? हे येणारा काळच समजवेल. सलमान खानने देखील शहनाजला समजावून सांगितलं आहे की, कालांतराने गोष्टी आपोआप सुधारल्या जातील.