मुंबई : दीपिका पदुकोणचा 'गहराईयां' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला खूप पसंती मिळत आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. मात्र, कंगना रानौतला दीपिकाचा हा चित्रपट आवडला नाही आणि तिने 'गहराईला'ला वाईट चित्रपट म्हटलं आहे. या सिनेमाबाबत एक पोस्ट शेअर करत म्हणाली की, तुम्ही चित्रपटात कितीही चांगला अभिनय केलात तरीपण वाईट चित्रपट हा वाईटच असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रनौतने शेअर केली पोस्ट
कंगना रणौतने 1965 साली रिलीज झालेल्या 'हिमायल की गोद' चित्रपटातील एक गाणं इन्स्टा स्टोरीवर शेअर केलं आहे. ज्यामध्ये मनोज कुमार नदीच्या काठावर बसून 'चांद सी मेहबूबा हो मेरी तुम' गाणं गाताना दिसत आहे.  हे गाणं दिग्गज गायक-संगीतकार मुकेश यांनी गायलं आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत कंगनाने दीपिकाच्या चित्रपट 'गहराईयां' सिनेमाला वाईट म्हटलं आहे.



'सिनेनाच्या नावावर कचरा फेकू नका'
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'मी सुद्धा मिलेनिअल आहे. मला या प्रकारचा रोमान्स समजतो. मिलेनियल, न्यू एज आणि अर्बन मूव्हीजच्या नावाने कचरा करू नका. वाईट चित्रपट वाईट असतात. तुम्ही कितीही चांगला अभिनय केलात किंवा अश्लीलता दाखवलीत, पण हे सगळं चित्रपट वाचवू शकत नाही. ही अगदी बेसिक फॅक्ट आहे. त्यात गहराईयावाली काहिच गोष्ट नाही.