मुंबई : टीव्हीचा सगळ्यात लोकप्रिय रिअॅलिटी क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करत असताना. मेगास्टार अमिताभ बच्चन अनेक किस्से सांगतात. अलीकडच्या भागात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जीवनाचा असाच एक किस्सा सांगितला आहे. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, कसे ते एकदा विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करत होते आणि त्यांना TC नं पकडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विना तिकिट पकडले गेले होते अमिताभ बच्चन
बिग बींनी सांगितलं की, त्यांना प्रवासाची खूप आवड होती आणि चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी ते अनेकदा आपल्या मित्रांसोबत फिरायला बाहेर पडायचे. मात्र, एकदा ते या फिरण्याच्या छंदाच्या प्रकरणामध्ये वाईट प्रकारे अडकले. हॉटसीटवर बसलेल्या हांशु रविदास यांच्याशी झालेल्या संभाषणात अमिताभ बच्चन म्हणाले की, 'आम्हाला एकदा TC नेही पकडलं आहे. तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो.


हँडलवर लटकून केला प्रवास
अमिताभ यांनी सांगितलं की, 'आमच्याकडे जास्त पैसे नसायचे तेव्हा, नोकरी पण नव्हती. तेव्हा मित्रांनी फिरायला जायचा प्लान केला . आधी मी या प्लानसाठी तयार नव्हतो मग सगळ्यांनी खूप जबरदस्ती केली आणि मी स्वत:ला रोकू शकलो नाही.  जाताना काहीच प्रॉब्लेम झाला नाही पण येताना मात्र आम्हला खूप त्रास झाला. आम्हाला TC ने पकडलं. आम्ही जसं TC  ला सांगितलं की, आमच्याकडे टिकिट नाहीये. तेव्हा त्यांनी मला ट्रेनमधून उतरायला सांगितलं.'


कोठून सुरू झाला TC चा किस्सा ?
अमिताभ बच्चन यांनी रेल्वे डब्याच्या दरवाजावर हँडल धरून लटकत असल्याचं सांगितलं. काठगोदामहून दिल्लीला ते दाराजवळ लटकून आले. अमिताभ बच्चन यांचा हा किस्सा ऐकून हंशू आणि संपूर्ण प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. स्पर्धक हांशुने 5000 च्या प्रश्नावर TTE शी संबंधित प्रश्नाचं उत्तर दिले होतं. त्यानंतर ही किस्सा सुरू झाला.