अभिनेते अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या  'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या रिअॅलिटी शोचा सध्या 14 वा सीजन सुरु आहे. या शोमध्ये येणारे सर्व स्पर्धक त्यांच्या पूर्ण तयारीनिशी येतात. पण तरीही कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण होते की हसू थांबवणं कठीण होऊन जातं. नुकतेच कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर असंच काहीसं घडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉटसीटवर कोण बसणार हे जाणून घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर अमिताभ बच्चन स्क्रीनकडे पाहू लागले आणि अचूक आणि सर्वात जलद कोण उत्तर देते हे शोधण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र कोणीही या प्रश्नाचे अचूक उत्तर कोणीच देऊ शकले नाही.


त्यानंतर अमिताभ बच्चन नुसतेच बघत राहिले. त्यांना काय बोलावे समजत नव्हते. मग बिग बी गमतीने म्हणाले, निल बट्टे सन्नाटा. तुम्ही सर्व भारतीय आहात का? कोणालाही उत्तर देता आलं नाही.



अमिताभ बच्चन यांनी खेळाडूंना विचारले होते की, यापैकी कोणते ठिकाण दिल्लीपासून सर्वात लांब आहे? त्यासाठी बंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि भुवनेश्वर हे पर्याय होते. या प्रश्नाचे अचूक उत्तर बंगळुरू होते.