मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' या टीव्ही शोमध्ये लोकं पैसे जिंकण्यासाठी येतात पण त्याचबोरबर यावेळी या शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला बॉलिवूडचा सुपरस्टारला पाहण्याचं स्वप्न असतं. अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी अनेक स्पर्धक नोंदणीपासून हॉटसीटपर्यंत प्रवास करतात. पण जरा विचार करा अमिताभ बच्चन यांना कधी राग आला तर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना कैफवर अमिताभ यांचा राग
असंच काहीसं टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये पाहायला मिळालं. शोच्या या स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेता अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी त्यांच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ हॉटसीटवर बसून अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जात होते.


सेट सोडून गेले अमिताभ बच्चन 
अचानक अमिताभ बच्चन यांना वाटलं की गेममध्ये फसवणूक केली जात आहे. यावर अमिताभ बच्चन यांनी आक्षेप घेतल्यानं ते चांगलेच संतापतात. 21 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की, अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान खुर्ची सोडून सेटवरून निघून गेले. परिस्थिती अशी बनली की संपूर्ण सेटवर आणि प्रेक्षकांमध्ये शांतता पसरली. सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते.


सेटवर प्रेक्षकांमध्ये शांतता
रोहित शेट्टीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आणि क्रू मेंबरसोबत सेटच्या मागे गेला. नंतर त्याने अक्षय कुमारला फोन केला आणि दोघं एकत्र सेटच्या मागे गेले. सेटवर कतरिना कैफ एकटीच बसली होती आणि तिचा चेहरा पडला. रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार परत आले आणि त्यांनी कतरिनाला समजावून सांगितलं की, शोमध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे.



जवळजवळ कतरिना कैफ रडू लागली होती
कतरिनाचादेखील चेहरा पडला होता आणि ती एक प्रकारे स्वत:ला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसली. अभिनेत्री अविश्वासाने बसली आणि काही वेळाने अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार सेटवर हसत हसत परतले. अमिताभ बच्चन हसले आणि म्हणाले की, सेटवर अक्षय कुमार असताना असं वातावरण असणं स्वाभाविक आहे. मात्र, अक्षय कुमार अमिताभ यांच्या सेटवर या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी देताना दिसला.