मुंबईः टीव्हीच्या दुनियेत गेल्या 14 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कलाकारांनाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं. मात्र आता या मालिकेबाबत एक धक्कादायक बातमी समोर येतेय ती अशी की, या शोचा एक महत्त्वाचा अभिनेता आता 14 वर्षांनंतर मालिका सोडू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे देशभरात प्रचंड चाहते आहेत. मात्र गेल्या काही वर्षात या मालिकेतील एकापाठोपाठ एक कलाकार ही मालिका सोडत आहेत. आता 'तारक मेहता'चा मुख्य अभिनेता शैलेश लोढा तब्बल 14 वर्षांनंतर शो सोडत असल्याची चर्चा आहे. त्याने शोचे शूटिंगही थांबवल्याची बातमी समोर आलीय.



ही बातमी कळल्यानंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसणार आहे. आतापर्यंत लोक दयाबेनची वाट पाहत होते, पण आता या शोचा कणा समजला जाणारा शैलेश लोढा या शोमधून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे. या शोमध्ये शैलेश लोढा जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्या चांगल्या मित्राच्या भूमिकेत आहे.



रिपोर्ट्सनुसार, शैलेश लोढा गेल्या एक महिन्यापासून शोमध्ये परतले नसल्याचे समजते. या शोमध्ये काम करताना शैलेश लोढा यांना स्वतःसाठी दुसरी संधी मिळू शकली नाही, एवढेच नाही तर या शोमध्ये काम करताना त्यांनी काही चांगल्या ऑफर्सही नाकारल्या. पण आता कलाकारांना चांगल्या संधी हातातून जाऊ द्यायची नाहीत. 'तारक मेहता'चे निर्मातेही त्यांच्या तारखांचा योग्य वापर करू शकत नसल्याने नाराज असल्याचंही सांगितले जात आहे.