Marathi Actress Rajlakshmi Khanvilkar: पंकज उधास यांची गाणी आजही आजरामर आहेत. त्यांची गाणी आजही तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या गाण्यात झळकलेले कलाकारांनाही तेव्हा खूप लोकप्रियता मिळाली होती. पंकज उधास यांचे चुपके चुपके सखीयोंसे वो (Chupke Chupke Sakhiyon Se) हे गाण खूप गाजलं होतं. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांनाही एका रात्रीत लोकप्रियता मिळाली होती. जॉन अब्राहम आणि राजलक्ष्मी खानविलकर या दोघांवर हे गाणं चित्रित झाले होते. या दोघांनाही खूप लोकप्रियता मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजलक्ष्मी खानविलकर या मराठमोळ्या अभिनेत्रीला तेव्हा खूप लोकप्रियता मिळाली होती. राजलक्ष्मी खानविलकर हिच्या सुंदरतेचे चाहते खूप होते. मात्र, या गाण्यात झळकल्यानंतर मात्र ती गायबच झाली. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून तिला संधीच मिळाली नाही. तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्याबाबतच अधिक चर्चा आहे. 1996मध्ये राजलक्ष्मी खानविलकरने बॉलिवूड अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केले. कॅडबरीच्या जाहिरातीदरम्यान त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न केले. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. 6 महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. 


एका मुलाखतीत समीर सोनी याने त्याच्या घटस्फोटाबाबत उघडपणे वक्तव्य देखील केले होते. माझ्या वैयक्तीत आयुष्यात खूप उलथापालथ सुरू होती. मला असं वाटलं की मी खासगी आयुष्यात अपयशी ठरत आहे. मला घटस्फोट नको होता. आम्ही आमच्या नात्याला आणखी वेळ देऊ शकलो असतो. कारण सहा महिन्यांपूर्वीच आमचे लग्न झाले होते. समीर सोनी यांने नंतर अभिनेत्री निलम कोठारीसोबत लग्न केले. या दाम्पत्याने एक मुलगीही दत्तक घेतली आहे. 


समीर सोनीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर राजलक्ष्मी खानविलकरने आशिकी फेम राहुल रॉय याच्यासोबत 2000 साली लग्न केले. मात्र, तिचे हे लग्नही फार काळ टिकले नाही. 2014 साली दोघेही वेगळे झाले. 14 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. राहुल रॉयसोबत घटस्फोट झाल्यानंतर राजलक्ष्मी खानविलकर यांच्याबाबत खूप कमी माहिती आहे. त्या आता काय करतात, कुठे आहेत याबाबत काहीच माहिती नाहीये.