मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. त्यांचा घटस्फोट हा गेल्या वर्षी झाला असला तरी देखील त्यांचा घटस्फोटावर अजूनही चर्चा सुरु असते. त्यानंतर आता नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


आणखी वाचा : Akshara Singh चा MMS Video लीक? सोशल मीडियावर व्हिडीओ लिंक व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागार्जुन यांनी नुकतीच पिंकव्हिलाला मुलाखत दिली. गेल्या वर्षी नागा चैतन्य आणि समांथाचा घटस्फोट झाला तरी देखील त्यांच्या विषयी होणाऱ्या चर्चांवर नागार्जुन यांनी त्यांच मत मांडलं आहे. 'तो आता आनंदी आहे आणि सध्या तरी मला हेच दिसतंय. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. त्याला आयुष्यात आलेला तो एक अनुभव होता. दुर्दैवी अनुभव. मात्र आपण सारखा तोच विषय घेऊन बसू शकत नाही. तो काळ गेला. तो काळ आता आमच्या आयुष्यात नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातूनही तो काळ निघून जावा अशी माझी इच्छा आहे', असे नागार्जुन म्हणाले. 


आणखी वाचा : मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा 'तो' Topless फोटो पुन्हा व्हायरल!



आणखी वाचा :  Alia Bhatt ला दिलेल्या वागणुकीमुळे रणबीर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, नेटकरी म्हणाले...


नागार्जुन यांनी पुढे चित्रपटांच्या रिमेकवर मत मांडले, 'लोकांनी चित्रपटांचे रिमेक बनवणं थांबवलं पाहिजे. प्रत्येकजण ओटीटीवर सगळे चित्रपट पाहतोय. त्यामुळे तुलना होणं स्वाभाविक आहे. याच कारणामुळे रिमेक बनवणं थांबलं पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे.'


आणखी वाचा : लग्नाआधीच बदललं ऋतिकच्या Girlfriend चं नाव? किस्सा एकदम ओके!


नागार्जुन हे नुकतेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसले. या चित्रपटात या तिघां व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून त्यानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.