Priyanka Chopra Prank With Abhishek Bachchan And Rani Mukerji : बॉलिवूड कलाकार त्यांच्या करिअरपेक्षा जास्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांचे अफेअर्स जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना असते. फक्त इतकंच नाही तर त्यांची लव्ह स्टोरी आणि लग्नाविषयी तर त्यांना सगळंच जाणून घ्यायचं असतं. कलाकारांचे ब्रेकअप झाले तर सुद्धा त्यांच्या चर्चा या शेवटपर्यंत सुरुच असतात. बॉलिवूडमधील अधिक कलाकार तर रिलेशनशिपमध्ये येतात मात्र शेवटी त्यांचा ब्रेकअप होतो. दरम्यान, सगळ्यात चर्चेत ठरलेलं ब्रेकअप म्हणजे राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचं. 


बंटी बबली चित्रपटादरम्यान, राणी आणि अभिषेक आले जवळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या 'बंटी और बबली' (Bunty Aur Babli)  या चित्रपटा दरम्यान, मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.  दोघे एकमेकांसोबत खूप वेळ व्यथित करू लागले. त्यावेळी सगळीकडे यांच्याच रिलेशनशिपची चर्चा सुरु होती. यादरम्यान बातमी अशीही आली होती की जया बच्चन यांनी राणी मुखर्जीला स्विकारले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही विभक्त झाले.


अभिषेक आणि राणी मुखर्जी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तेव्हा थांबल्या जेव्हा अभिनेत्यानं ऐश्वर्या रायशी (Aishwarya Rai) लग्न केले. दरम्यान, एकदातर अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) अभिषेक आणि राणी मुखर्जीसोबत एक मोठा प्रॅंक केला होता. प्रियांकानं अभिषेकच्या मोबाईलवरून राणी मुखर्जीला मेसेज केला होता. दरम्यान, अभिषेकनं हा मेसेज केलाय हे पाहून राणी मुखर्जीनं त्याला मजेशीर उत्तर दिले होते. 


हेही वाचा : 'आमची भेट...', Shahrukh Khan च्या मुलाला डेट करण्याबाबत पाकिस्तानी अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली...


प्रियांकाने 2006 मध्ये सिमी गिरेवालला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला होता. प्रियांकाला अभिषेकसोबत केलेल्या या प्रँक विषयी विचारण्यात आले तेव्हा लाजत प्रियांका म्हणाली की हो मी अभिषेकसोबत प्रँक केला होता. 


प्रियांका पुढे म्हणाली की अभिषेकनं प्रँकची सुरुवात केली होती. मी, अभिषेक आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एकत्र चित्रपटाचे शूटिंग करत होतो. तेव्हा अभिषेक माझ्या बाजूला येऊन बसला, माझा फोन तिथेच बाजूला पाहून त्यानं लपवून ठेवला होता, मला माझा फोन मिळत नव्हता आणि मी शोधत होते. पण जेव्हा तो जागेवरून उठला तेव्हा मला फोन मिळाला. त्यानंतर अभिषेक त्याचा फोन तेथेच ठेवून दुसरीकडे गेला आणि प्रियांकाला संधी मिळाली. प्रियांकानं लगेच अभिषेकच्या फोनवरून राणी मुखर्जीला मेसेज केला की, तू कुठे होतीस... मला तुझी आठवण येते. यावर उत्तर देत राणी म्हणाली, काय झालं एबी. दरम्यान, या प्रँकनंतर प्रियांकाला लाज वाटल्याचे तिनं सांगितले.